दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताची ८० धावांपर्यंत मजल

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात केपटाऊन इथं सुरु असलेल्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात भारतानं ४ गड्यांच्या मोबदल्यात ८० धावांपर्यंत मजल मारली आहे. पहिल्या डावात मिळालेल्या १३ धावांच्या आघाडीसह भारताची एकूण आघाडी आता ९३ धावांपर्यंत पोहचली आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा विराट कोहली आणि ऋषभ पंत हे भारतीय फलंदाज अनुक्रमे १६ आणि २० धावांवर खेळत होते. या सामन्याचा आजचा तिसरा दिवस असून हा सामना निकाली होण्याच्या मार्गावर आहे. मालिकेतल्या पहिल्या दोन सामन्यांपैकी एकेक सामना जिंकून दोन्ही संघानी मालिकेत बरोबरी साधली आहे.