भारतीय तटरक्षक दलाने आतापर्यंत १० हजार जणांचे वाचवले प्राण - के नटराजन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय तटरक्षक दलानं आपल्या स्थापनेपासून म्हणजे १९७८ पासून आजतागायत १० हजार जणांचे प्राण वाचवले आहेत, असं भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक के नटराजन यांनी सांगितलं. राष्ट्रीय मेरीटाईम शोध आणि बचाव संस्थेच्या बैठकीत ते आज नवी दिल्ली इथं बोलत होते. या बैठकीत सागरी सुरक्षेसंबंधी विविध पैलूंवर तसंच शोध आणि बचावकार्याविषयी अभिनव तंत्रज्ञान या मुद्द्यांवर चर्चा झाली. सागरी क्षेत्रात शाश्वत सुरक्षिततेसाठी कोणत्या उपाययोजना केल्या जाव्यात यावरही या बैठकीत विचारविनिमय झाला.भारतीय तटरक्षक दलानं चेन्नई, मुंबई आणि अंदमान निकोबार बेटांवर तीन सागरी बचाव समन्वय केंद्रं स्थापन केली आहेत.

Popular posts
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image