भारत संयुक्त राष्ट्राच्या एकजुटीसाठी वचनबद्ध - परराष्ट्र व्यवहारमंत्री
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी आज संयुक्त राष्ट्र दिनानिमित्त भारताच्या संयुक्त राष्ट्रसाठीच्या वचनबद्धतेला दुजोरा दिला. यावेळी पाठवलेल्या संदेशात डॉ जयशंकर यांनी सुधारित बहुपक्षीयतेच्या महत्त्वाचा पुनरुच्चार केला. जो पुनर्संतुलन, निष्पक्षता आणि बहुध्रुवीयता प्रतिबिंबित करतो. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं अस्थायी सदस्य म्हणून भारत समकालीन आव्हानांकडे तत्त्वनिष्ठ दृष्टीकोन बाळगेल, तसंच संयुक्त राष्ट्र संघाची प्रभावीता आणि विश्वासार्हता वाढवण्यासाठी भारत नेहमीच एक विधायक शक्ती म्हणून काम करेल, असं ते म्हणाले.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.