स्वामित्व योजनेमुळे लोकांना बँकांकडून कर्ज घेणं सोपं जाणार प्रधानमंत्र्यांचे प्रतिपादन
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वामित्व योजनेमुळे लोकांना बँकांकडून कर्ज घेणं सोपं जाणार आहे. असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. त्यांनी आज मध्य प्रदेशमधल्या प्रधानमंत्री स्वामित्व योजनेतल्या लाभार्थींसोबत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आज संवाद साधला. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते एक लाख ७१ हजार लाभार्थींना ई-मालमत्ता पत्र अर्थात ई-प्रॉपर्टी कार्डाचं वितरण करण्यात आलं. १९ जिल्ह्यामधल्या तीन हजार गावांतल्या लाभार्थ्यांना ही मालमत्ता पत्रं देण्यात आली. या आधी मालमत्तेचे कागदपत्र नसल्यामुळे लोकांना सावकारांनकडे भीक मागावी लागायची आता माझ्या गरिब भावा-बहिणीवर ही वेळ येणार नाही, असं प्रधानमंत्री म्हणाले. मालमत्तेचे कागदपत्र नसणं ही जागतिक समस्या आहे, त्यावर केंद्र सरकारनं उपाय शोधला आहे, असंही ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे देखिल उपस्थित होते.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.