एम.एस.एम.ई मध्ये समावेश केल्यामुळे कोट्यवधी व्यापाऱ्यांना अर्थसहाय्य मिळेल - प्रधानमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : किरकोळ आणि घाऊक व्यापाराचा सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगक्षेत्रात समावेश करायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. हा ऐतिहासिक निर्णय आहे. या निर्णयामुळे देशभरातल्या कोट्यवधी व्यापाऱ्यांना अर्थसहाय्य उभं करायला, तसंच इतर लाभ मिळवत आपला व्यापार वाढवायला मदत होईल, असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. देशभरातल्या व्यापाऱ्यांना सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे.

सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी काल या क्षेत्रांसंबंधीच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. किरकोळ आणि घाऊक व्यापाराचा या क्षेत्रात समावेश करायचं या सूचनांमध्ये नमूद केलं केलं होतं. या नव्या मार्गदर्शक सूचनांचा देशभरातल्या सुमारे अडीच कोटी किरकोळ आणि घाऊक व्यापाऱ्यांना फायदा होईल असं गडकरी यांनी म्हटलं आहे.

 

 

Popular posts
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून दाऊद टोळीतल्या दोघांना अटक
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image