एम.एस.एम.ई मध्ये समावेश केल्यामुळे कोट्यवधी व्यापाऱ्यांना अर्थसहाय्य मिळेल - प्रधानमंत्री
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : किरकोळ आणि घाऊक व्यापाराचा सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगक्षेत्रात समावेश करायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. हा ऐतिहासिक निर्णय आहे. या निर्णयामुळे देशभरातल्या कोट्यवधी व्यापाऱ्यांना अर्थसहाय्य उभं करायला, तसंच इतर लाभ मिळवत आपला व्यापार वाढवायला मदत होईल, असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. देशभरातल्या व्यापाऱ्यांना सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे.
सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी काल या क्षेत्रांसंबंधीच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. किरकोळ आणि घाऊक व्यापाराचा या क्षेत्रात समावेश करायचं या सूचनांमध्ये नमूद केलं केलं होतं. या नव्या मार्गदर्शक सूचनांचा देशभरातल्या सुमारे अडीच कोटी किरकोळ आणि घाऊक व्यापाऱ्यांना फायदा होईल असं गडकरी यांनी म्हटलं आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.