राज्यांना दिल्या जाणाऱ्या रेमेडिसिवीर इंजेक्शनच्या कोट्यात केंद्र सरकारकडून वाढ


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं राज्यांना दिल्या जाणाऱ्या रेमेडिसिवीर इंजेक्शनच्या कोट्यात वाढ केली आहे. केंद्रीय रसायन आणि खत मंत्री सदानंद गौडा यांनी रेमडेसीवीरच्या उपलब्धेविषयी आढावा घेतल्यानंतर, बातमीदारांना ही माहिती दिली.

आता वाढलेल्या कोट्यानुसार २ मे पर्यंत पुढच्या महाराष्ट्राला दिल्या जाणाऱ्या रेमेडिसीवीरच्या मात्रांमधे ३८ हजार ५०० इतकी, वाढ केली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राला एकूण ४ लाख ७३ हजार ५०० मात्रा मिळतील.

दिल्लीला दिल्या जाणाऱ्या मात्रांमधे ९ हजार ३०० ची वाढ केली आहे, त्यामुळे दिल्लीला एकूण ८१ हजार ३०० मात्रा मिळतील असं त्यांनी सांगितलं. रेमेडिसीवरच्या उत्पादनात प्रयत्नपूर्वक वाढ केली असल्यानं, त्यानुसार हा कोटा वाढवला असल्याचं गौडा यांनी सांगितलं.

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image