पॅरिस करारांतर्गत पर्यावरण संतुलनासाठी निश्चित केलेलं लक्ष्य भारत लवकरच साध्य करेल - प्रकाश जावडेकर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पॅरिस करारांतर्गत पर्यावरण संतुलनासाठी निश्चित केलेलं लक्ष्य भारत लवकरच साध्य करेल, अशी ग्वाही पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज लोकसभेत दिली. या संदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितलं, भारतानं पर्यावरण रक्षणासाठी तयार केलेल्या सर्वंकष उपाय योजनांमुळे भारतात उत्सर्जनाचं प्रमाण 2005 ते 2016 दरम्यान 24 टक्क्यांनी घटलं आहे.

देशातल्या जंगल क्षेत्रातही 24 पूर्णांक 56 शतांश टक्के इतकी लक्षणीय वाढ झाल्याचं ते म्हणाले. स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत पुढील पाच वर्षात देशातल्या 100 शहरांमधलं प्रदुषण कमी करण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. अन्य विकसित देशाच्या तुलनेत देशातलं कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण कमी असल्याचं त्यांनी सांगितलं.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image