चेन्नई क्रिकेट कसोटीमध्ये दुसऱ्या दिवस अखेर भारताकडे २४९ धावांची आघाडी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नई इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आज दुसऱ्या दिवशी भारताच्या दुसऱ्या डावात एक बाद ५४ धावा झाल्या आहेत.

त्यापूर्वी आज सकाळी भारताचा पहिला डाव ३२९ धावांवर तर इंग्लंडचा पहिला डाव १३४ धावांवर संपुष्टात आला.

रविचंद्रन अश्विनने ४३ धावा देत, इंग्लंडचे पाच गडी बाद केले. इशांत शर्मा आणि अक्षर पटेलने प्रत्येकी एक तर मोहम्मद सिराजने एक बळी घेतला.

आजच्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा शुभमन गील १४ धावांवर बाद झाला होता, तर रोहित शर्मा २५ आणि चेतेश्वर पुजारा सात धावांवर खेळत होते.

सामन्यात सध्या भारतीय संघानं २४९ धावांची आघाडी घेतली आहे. मालिकेत पहिला कसोटी सामना जिंकून इंग्लंड संघ एक शून्यने आघाडीवर आहे.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image