केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेला आज २ वर्ष पूर्ण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेला आज २ वर्ष पूर्ण होत आहेत. देशातल्या शेतकऱ्यांच्या जीवनात कायापालट घडवून आणण्यासाठी केंद्रसरकार बांधिल असल्याचा पुनरुच्चार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटर संदेशात केला आहे.

शेतकऱ्यांचं आयुष्य अधिक सुलभ करण्यामधे या योजनेनं महत्त्वाची भूमिका बजावली आहे, आता देशातले शेतकरीही आत्मनिर्भर भारत मोहिमेचा अविभाज्य भाग बनत आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.

गेल्या ७ वर्षात सरकारनं आरोग्य क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी अनेक पावलं उचलली. अधिक चांगल्या सिंचन सुविधा, तंत्रज्ञान, कर्ज-उपलब्धता, मोठ्या बाजारपेठांशी संपर्क, पीकविमा, मातीच्या आरोग्यावर भर इत्यादी गोष्टी केल्या. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत, असं ते म्हणाले.

किमान आधारभूत दरात ऐतिहासिक वाढ केल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकार बांधिल  असल्याचा पुनरुच्चारही मोदी यांनी केला.

Popular posts
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image