केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेला आज २ वर्ष पूर्ण
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेला आज २ वर्ष पूर्ण होत आहेत. देशातल्या शेतकऱ्यांच्या जीवनात कायापालट घडवून आणण्यासाठी केंद्रसरकार बांधिल असल्याचा पुनरुच्चार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटर संदेशात केला आहे.
शेतकऱ्यांचं आयुष्य अधिक सुलभ करण्यामधे या योजनेनं महत्त्वाची भूमिका बजावली आहे, आता देशातले शेतकरीही आत्मनिर्भर भारत मोहिमेचा अविभाज्य भाग बनत आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.
गेल्या ७ वर्षात सरकारनं आरोग्य क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी अनेक पावलं उचलली. अधिक चांगल्या सिंचन सुविधा, तंत्रज्ञान, कर्ज-उपलब्धता, मोठ्या बाजारपेठांशी संपर्क, पीकविमा, मातीच्या आरोग्यावर भर इत्यादी गोष्टी केल्या. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत, असं ते म्हणाले.
किमान आधारभूत दरात ऐतिहासिक वाढ केल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकार बांधिल असल्याचा पुनरुच्चारही मोदी यांनी केला.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.