देशात गेल्या २२ महिन्यांत रेल्वे अपघातात एकाही प्रवाशाचा मृत्यू नाही - पीयूष गोयल
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या २२ महिन्यांत देशात रेल्वे अपघातात एकाही प्रवाशाचा मृत्यू झालेला नाही, अशी माहिती रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी राज्यसभेत आज एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेगाड्यांमध्ये अद्ययावत सुरक्षा तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
देशातील जनतेच्या राहणीमानात सुधारणा करण्यासाठी रेल्वेच्या पायाभूत सुविधा विकासावर भर देण्यात येत आहे, असेही गोयल यांनी नमूद केले.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.