मुख्यमंत्री यांच्याकडून जळगाव दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी २ लाखांची तातडीची मदत जाहीर

 

मुंबई (वृत्तसंस्था) : जळगाव जिल्ह्यात झालेल्या दुर्घटनेतल्या मृत मजुरांच्या कुटुंबांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची तातडीची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. जखमींच्या उपचाराची खर्चही राज्य सरकार करणार आहे.

अपघाताचं वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी जळगाव जिल्हा प्रशासनाकडून घटनेची माहिती घेतली, तसंच संबंधित अपघातग्रस्तांना सर्व आवश्यक मदत करण्याचे निर्देश दिले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी दुःख व्यक्त केलं आहे. जखमींची प्रकृती लवकर सुधारावी अशी प्रार्थना त्यांनी केली आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, अन्न आणि प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांनीही या दुर्घेटनेतल्या मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image