तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल भारताचा इंग्लंडवर १० गडी राखून विजय
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अहमदाबादमधे नरेंद्र मोदी स्टेडिअममधे झालेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल दुसऱ्याच दिवशी भारतानं इंग्लंडवर १० गडी राखून दणदणीत विजय मिळवला. याबरोबरच ४ सामन्यांच्या या मालिकेत भारतानं २-१ अशी आघाडी घेतली आहे.
काल इंग्लंडचा दुसरा डाव ८१ धावांवर गुंडाळल्यानंतर भारताचा सलामीचा फलंदाज रोहित शर्मा आणि शुभमन गील मैदानात उतरले. पहिल्या डावात ३३ धावांची आघाडी मिळवलेली असल्यानं भारताला विजयासाठी फक्त ४९ धावांची गरज होती. ती या दोघांनी पूर्ण केली.इंग्लंडच्या दुसऱ्या डावात ४ बळी मिळवणारा आर आश्विन सर्वात जलद ४०० बळी मिळवणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.