मुंबई (वृत्तसंस्था) : विदर्भाच्या काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली .वाशीम जिल्ह्यातील कारंजा आणि मंगरुळपीर तालुक्यातील काही गावात पाऊस झाल्यानं शेतकरी धास्तावला आहे. सध्या जिल्ह्यात हरभऱ्याचं पिक काढणीला आलं असून शेतात गहू उभा असल्यानं पावसामुळेया पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
अकोला जिल्ह्यातल्या वाडेगाव, देगाव, रिधोरा, तेल्हारा, वरूड बुजरुक, अकोट सह अकोला शहरातही पावसानं हजेरी लावली. अमरावती जिल्ह्यात काल रात्री वरुड,अचलपूर, चांदूर बाजार,चांदूर रेल्वे तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. गोंदियात पडलेल्या पावसाचा फटका कडधान्य आणि गहू पिकाला बसण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.