अवकाळी पावसाची विदर्भाच्या काही भागात हजेरी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : विदर्भाच्या काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली .वाशीम जिल्ह्यातील कारंजा आणि मंगरुळपीर तालुक्यातील काही गावात पाऊस झाल्यानं शेतकरी धास्तावला आहे. सध्या  जिल्ह्यात हरभऱ्याचं पिक काढणीला आलं  असून शेतात गहू उभा असल्यानं पावसामुळेया पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

अकोला जिल्ह्यातल्या वाडेगाव, देगाव, रिधोरा, तेल्हारा, वरूड बुजरुक, अकोट सह अकोला शहरातही पावसानं हजेरी लावली. अमरावती जिल्ह्यात काल रात्री वरुड,अचलपूर, चांदूर बाजार,चांदूर रेल्वे तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. गोंदियात पडलेल्या पावसाचा फटका   कडधान्य  आणि गहू पिकाला बसण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.

Popular posts
देशांतर्गत मागणीला प्रोत्साहन देण्यासाठी ७३ हजार कोटीची घोषणा
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
एम. व्ही. मंगलम या कार्गो जहाजावरच्या १६ कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image