राज्यात आतापर्यंत १८ लाख ९० हजार ३२३ रुग्ण कोरोनामुक्त
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ३ हजार ८५४ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत १८ लाख ९० हजार ३२३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
राज्यातला कोरोना मुक्तीचा दर ९४ पूर्णांक ८६ शतांश टक्के झाला आहे. काल १ हजार ९२४ नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातल्या कोरोना बाधितांची एकूण संख्या १९ लाख ९२ हजार ६८३ झाली आहे.
सध्या राज्यभरात ५० हजार ६८० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल ३५ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला.राज्यात या संसर्गानं दगावेल्या रुग्णांची एकूण संख्या ५० हजार ४७३ झाली असून, मृत्यूदर २ पूर्णांक ५३ शतांश टक्के झाला आहे
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.