केंद्र सरकारने तयार केलेले तिन्ही कृषी कायदे शेतकरी हिताचे - मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने तयार केलेले तिन्ही कृषी कायदे शेतकरी हिताचे असल्याचे मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी म्हटले आहे. ते आज नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर इथे दर्शनासाठी आले असता बातमीदारांशी बोलत होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे शेतकरी हित पाहणारे एकमेव प्रधानमंत्री आहेत, त्यांना थेट निवडणुकीत पराभूत करू न शकणारे, शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवत आहेत, असे ते म्हणाले.
कोणत्याही प्रकारे कृषी उत्पन्न बाजार समित्या रद्द होणार नाहीत, देशातला शेतकरी मोदी यांच्याबरोबर आहे, ज्या शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे त्यांच्याशी केंद्रीय कृषी मंत्री चर्चा करीत आहेत, ४ जानेवारीला होणाऱ्या चर्चेत निश्चितच तोडगा निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.