शेतकऱ्यांना एका अर्जाद्वारे सर्व कृषियोजनांचा लाभ मिळणार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कृषि विभागाच्या सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे मिळण्यासाठी शेतकरी बांधवांनी महा-डीबीटी पोर्टलवर आपले अर्ज माहितीसह ३१ डिसेंबरपर्यंत सादर करावेत, असं आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे. ३१ डिसेंबरपर्यंत प्राप्त सर्व अर्ज लॉटरीसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.

  शेतकऱ्यांच्या सोयीकरिता महा-डीबीटी पोर्टलवर “शेतकरी योजना” या सदराखाली सर्व योजनांचा लाभ “एकाच अर्जाद्वारे” घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी आपला मोबाईल क्रमांक आधार कार्डशी संलग्न करणं आवश्यक आहे. 

  त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही. मोबाईल, संगणक/लॅपटॅाप/टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र, ग्रामपंचायतीतलं संग्राम केंद्र अशा माध्यमातून शेतकरी mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करू शकतात. ज्यांनी अद्याप महा डीबीटी पोर्टलवर अर्ज केला नसेल, त्यांना येत्या  ३१ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image