राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं काल फेटाळली



नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं काल फेटाळून लावली. याचिकेत उल्लेख केलेले प्रसंग मुंबईत घडले आहेत. मुंबई म्हणजे सर्व महाराष्ट्र समजू नका, असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी याचिकाकर्त्यांना सुनावलं. दिल्लीतले वकिल ऋषभ जैन, गौतम शर्मा आणि विक्रम गेहलोत यांनी ही याचिका दाखल केली होती. 



केवळ बॉलीवूडच्या अभिनेत्याच्या मृत्यूसारख्या, काही उदाहरणांवर विसंबून महाराष्ट्रात राज्य घटनेनुसार कारभार होत नसल्याचा निष्कर्ष तुम्ही कसा काय काढला, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयानं याचिकार्त्यांना केला. या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयाऐवजी राष्ट्रपतींकडे जाण्याची सूचनाही त्यांनी याचिकाकर्त्यांना केली.

 


Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image