प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदत देण्याचं दादाजी भुसे यांचं आश्वासन


मुंबई (वृत्तसंस्था) : गेल्या काही दिवसांमधे झालेल्या मुसळधार पावसामुळे औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या पिक नुकसानीचे आठवड्याभरात पंचनामे करावेत, असे निर्देश कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. भुसे यांनी आज औरंगाबादमधे कन्नड तालुक्यातल्या नागद इथं भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पिक नुकसानीसंदर्भात आढावा बैठक घेतली, त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.

पंचनाम्याचे अहवाल राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडून, त्यानंतर मदतीसंदर्भातला निर्णय घेतला जाईल असं त्यांनी सांगितलं. हे अहवाल केंद्र सरकारलाही सादर करू, तसंच नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक पाठवण्याबद्दल विनंती करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांनी ज्या विमा कंपन्यांकडून पिकविमा काढला आहे, त्या कंपन्यांना सूचना दिली असल्याची माहितीही त्यांनी दिली. नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला मदत मिळेल असं आश्वासनही त्यांनी दिलं. 


Popular posts
देशांतर्गत मागणीला प्रोत्साहन देण्यासाठी ७३ हजार कोटीची घोषणा
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
एम. व्ही. मंगलम या कार्गो जहाजावरच्या १६ कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image