बालमृत्यू दर कमी करण्यात भारताला उल्लेखनीय यश - युनिसेफ


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बालमृत्यू दर कमी करण्यात भारताला उल्लेखनीय यश आलं असून, जागतिक पातळीवर भारताने एक हजार जन्म होण्याच्या तुलनेतील मृत्यू दरानुसार १९९० मधील १२६ वरून २०१९ मध्ये ३४ पर्यंत मृत्यू दर कमी केला आहे. संयुक्त राष्ट्रांची बालनिधी संघटना म्हणजेच युनिसेफने जाहीर केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

भारतातील बालमृत्यू दर ४ पूर्णांक पाच दशांश टक्के झाला आहे. १९९० मध्ये भारतात ३४ लाख बालमृत्यू झाले होते, २०१९ मध्ये हे प्रमाण ८ लाख २४ हजारांवर आले आहे. नवजात अर्भक मृत्यूदर १९९० मधील ८९ वरून २८ वर आला आहे.


Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image