वंदे भारत या मोहीमेअंतर्गत, मुंबईत एकूण १७ विमानांमधून राज्यातले २ हजार ४२३ नागरिक दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी सुरु असलेल्या वंदे भारत या मोहीमेअंतर्गत, मुंबईत एकूण १७ विमानांमधून, महाराष्ट्रातले २ हजार ४२३ नागरिक आले आहेत. यापैकी ९०० जण मुंबई शहरातले, १ हजार १३९ जण राज्यातल्या विविध जिल्ह्यांमधले तर ३७८ जण इतर राज्यांमधले आहेत. दरम्यान मुंबईत आलेल्या नागरिकांना वेगवेगळ्या ४३ हॉटेलांमधे क्वारंटाईन केलेलं आहे. क्वारंटाईनच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेनं ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं पथक, तर राज्य सरकारनंही १५ कर्मचाऱ्यांचं पथक स्थापन केलं आहे.
Popular posts
मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज तब्बल ९३४ अंकांची उसळी
• महेश आनंदा लोंढे

तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
• महेश आनंदा लोंढे

बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
• महेश आनंदा लोंढे

पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
• महेश आनंदा लोंढे

अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
• महेश आनंदा लोंढे

Publisher Information
Contact
ekachdheya17@gmail.com
9860638161
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.
Share this page
Email
Message
Facebook
Whatsapp
Twitter
LinkedIn