वंदे भारत या मोहीमेअंतर्गत, मुंबईत एकूण १७ विमानांमधून राज्यातले २ हजार ४२३ नागरिक दाखल
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी सुरु असलेल्या वंदे भारत या मोहीमेअंतर्गत, मुंबईत एकूण १७ विमानांमधून, महाराष्ट्रातले २ हजार ४२३ नागरिक आले आहेत. यापैकी ९०० जण मुंबई शहरातले, १ हजार १३९ जण राज्यातल्या विविध जिल्ह्यांमधले तर ३७८ जण इतर राज्यांमधले आहेत. दरम्यान मुंबईत आलेल्या नागरिकांना वेगवेगळ्या ४३ हॉटेलांमधे क्वारंटाईन केलेलं आहे. क्वारंटाईनच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेनं ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं पथक, तर राज्य सरकारनंही १५ कर्मचाऱ्यांचं पथक स्थापन केलं आहे.
परदेशातून आलेल्या नागरिकांना त्यांचे जिल्हे आणि इतर राज्यांमधे पाठवण्याची व्यवस्था मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून केली जात आहे. दरम्यान येत्या काळात जोहान्सबर्ग, जकार्ता, लंडन, मनीला, टोकिओ, कोलम्बो, मॉरिशस, नैरोबी या आंतरराष्ट्रीय शहरांमधे अडकलेल्या असंख्य भारतीय नागरिकांना मुंबईत आणलं जाणार असल्याचं आमच्या प्रतिनिधीने कळवलं आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.