केंद्र सरकार अप्रमाणित अन्नधान्य आणि डाळींवर ५ टक्के जीएसटी लावणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारतर्फे अप्रमाणित अन्नधान्य आणि डाळींवर नव्यानं पाच टक्के जीएसटी लावला जाणार असल्य़ाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या छोट्या व्यापाऱ्यांनी आज एक दिवसाचा लाक्षणिक संप  पुकारला आहे.

२०१७ मध्ये जीएसटी लागू केल्यानंतर अप्रमाणित अन्नधान्य आणि डाळींवर जीएसटी लागू केला जाणार नसल्याचं केंद्र सरकारनं सांगितलं होतं. शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांना जीएसटीमुळे आर्थिक झळ सोसावी लागत असल्यानं सरकारच्या जीएसटी वाढीच्या विरोधात संप पुकारल्याची माहिती आमच्या बातमीदारानं दिली आहे. 

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image