भारत-प्रशांत विभागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताचा महत्वाचा वाटा; अमेरिकेचं मत
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत-प्रशांत क्षेत्रात शांतता प्रस्थापित करण्याच्या कामात भारत आणि इतर भागीदार देशांची महत्वाची भूमिका असल्याचं अमेरिकेचे अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉइड ऑस्टिन यांनी म्हटलं आहे. ते सिंगापूर इथं झालेल्या शांग्रीला संवाद सत्रात बोलत होते. मुक्त आणि खुलं भारत प्रशांत क्षेत्र ही अमेरिकेच्या सुरक्षाविषयक धोरणांच्या केंद्रस्थानी असलेली बाब आहे, या क्षेत्रातल्या विविध देशांनी अमेरिकेसोबत केलेली भागीदारी हाच शांततापूर्ण जगाचा गाभा असल्याचं ऑस्टिन म्हणाले. अमेरिका इतर देशांसोबत विशेषतः भारतासोबतचे संबंध अधिक दृढ करत असून, भारताची वाढती लष्करी आणि तांत्रिक क्षमता या क्षेत्राला स्थैर्य मिळवून देऊ शकते असं ते म्हणाले.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.