संपामुळं झालेलं नुकसान कामावर रुजू झालेल्या कामगारांकडून वसूल करण्याचा कोणताही निर्णय घेतला नसल्याचं एसटी महामंडळाकडून स्पष्ट
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एसटी संपामुळं महामंडळाचं झालेलं नुकसान कामावर रुजू झालेल्या कामगारांकडून वसूल करण्याचा कोणताही निर्णय घेतला नसल्याचं एसटी महामंडळानं स्पष्ट केलंय. काही माध्यमांनी यासंदर्भातलं वृत्त प्रसिद्ध केलं होतं. मात्र असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही किंवा विचाराधीनही नाही अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष शेखर चन्ने यांनी दिली आहे. अशा तथ्यहीन वृत्तांवर कामगारांनी विश्वास ठेवु नये आणि संपकरी कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर रुजू व्हावं असं आवाहनही त्यांनी केलं.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.