देशातल्या ६ लाख गावांमध्ये राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत मोहिमेचा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडून शुभारंभ
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी आज प्रयागराजहून स्वच्छ भारत कार्यक्रमाचा आरंभ केला. चंद्रशेखर आजादांच्या पुतळ्याला हार घालून आणि चंद्रशेखर आजाद उद्यानात रोप लावून त्यांनी स्वच्छता मोहिमेचा आरंभ केला. स्वच्छता मोहिमेचा महिनाभर चालणारा हा कार्यक्रम म्हणजे आजादी का अमृतमहोत्सव उपक्रमाचा एक भाग आहे. स्वच्छतेबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करुन कचरा निर्मूलनात सहभागी होण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणे तसेच पुनर्वापर न करता येणाऱ्या प्लॅस्टिकचे उच्चाटन अशी या मोहिमेमागील उद्दिष्टे आहेत. देशभरातील 744 जिल्ह्यांमधील सहा लाख गावांमध्ये ही मोहिम राबवली जाणार आहे. त्यासाठी नेहरु युवा संघटन आणि इतर संलग्न युवा क्लब तसेच राष्ट्रीय सेवा योजनेशी संबधित संस्थांच्या माध्यमातून या मोहिमेला चालना मिळेल.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.