घरोघरी शौचालय उपलब्ध असतानाही ते न वापरणाऱ्या ग्रामस्थांना नोटीसा देण्यात येणार
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : ग्रामीण जनतेत शौचालय वापराचं महत्त्व बिंबवण्यासाठी विविध जनजागृतीचे विविध उपक्रम राबवावेत अशी सूचना उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी केली आहे. उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन च्या आढावा बैठकीत काल ते बोलत होते. बैठकीत पाणीपुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे उपस्थित होते. जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात प्रत्येक कुटुंबाला प्रतिव्यक्ती ५५ लिटर पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टिकोनातून कृती आराखड्यात घेण्यात आलेल्या सर्व नळ योजनांची कामे अधिक गतिमान करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. घरोघरी शौचालय उपलब्ध असतानाही ते न वापरणाऱ्या ग्रामस्थांना नोटीसा द्याव्यात तसंच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी अशा सूचना खासदार ओम प्रकाश राजे निंबाळकर यांनी प्रशासनास केल्या. आमदार कैलास पाटील आणि शासकीय अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.