राज्यात काल ३ हजार २९२ रुग्ण कोरोनामुक्त

 


मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ३ हजार २९२ रुग्ण बरे होऊन घरी गेले, ३ हजार २०६ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ३६ रुग्णांचा मृत्यू झाला.राज्यात आतापर्यंत एकूण ६५ लाख ४४ हजार ३२५ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ६३ लाख ६४ हजार २७ रुग्ण बरे झाले. तर, १ लाख ३८ हजार ८७० रुग्ण दगावले. सध्या राज्यात ३७ हजार ८६० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक २४ शतांश टक्के झालं आहे. तर, मृत्यूदर २ पूर्णांक १२ शतांश टक्के आहे. 

 

 

 

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image