राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत ६८ कोटी ४६ लाख लसींच्या वितरणाचा टप्पा पार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं आपल्या राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत ६८ कोटी ४६ लाख लसींच्या मात्रा नागरिकांना दिल्या आहेत. काल दिवसभरात ७१ लाख ६१ हजार नागरिकांनी लस घेतली. काल ४२ हजार नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद झाली तर सुमारे ३६ हजार रुग्ण कोरोनमुक्त झाले. ३०८ रुग्णांचा मृत्यू झाला.  आतापर्यंत देशात ३ कोटी २१ लाखांहून अधिक नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. देशाचा रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ४२ शतांश टक्के झाला आहे. सध्या देशात ४ लाख १० हजार रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत ५३ कोटी चाचण्या करण्यात आल्या.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image