राज्यात ८ हजार १९६ रुग्ण कोरोनामुक्त

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल नव्यानं आढळलेल्या कोविड रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त होती. त्यामुळे कोरोनामुक्तीचा दर वाढला आहे. तर उपचाराधीन रुग्णांची संख्या ६० हजाराच्या खाली आली आहे. काल ८ हजार १९६ रुग्ण बरे होऊन घरी गेले, ५ हजार १३२ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १५८ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण ६४ लाख ६ हजार ३४५ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ६२ लाख ९ हजार ३६४ रुग्ण बरे झाले. तर १ लाख ३५ हजार ४१३ रुग्ण दगावले. सध्या राज्यात ५८ हजार ६९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९६ पूर्णांक ९३ शतांश टक्के झालं आहे. तर, मृत्यूदर २ पूर्णांक ११ शतांश टक्के आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image