मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल नव्यानं आढळलेल्या कोविड रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त होती. त्यामुळे कोरोनामुक्तीचा दर वाढला आहे. तर उपचाराधीन रुग्णांची संख्या ६० हजाराच्या खाली आली आहे. काल ८ हजार १९६ रुग्ण बरे होऊन घरी गेले, ५ हजार १३२ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १५८ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण ६४ लाख ६ हजार ३४५ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ६२ लाख ९ हजार ३६४ रुग्ण बरे झाले. तर १ लाख ३५ हजार ४१३ रुग्ण दगावले. सध्या राज्यात ५८ हजार ६९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९६ पूर्णांक ९३ शतांश टक्के झालं आहे. तर, मृत्यूदर २ पूर्णांक ११ शतांश टक्के आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.