नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात गेल्या २४ तासात ३०, हजार ५४९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४२२ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ३८ हजार ८८७ नागरिक बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत तीन कोटी १७ लाख २६ हजार ५०७ रुग्णाना कोरोनाची लागण झाली असून एकूण यापैकी तीन कोटी आठ लाख ९६ हजार ३५४ नागरिक बरे झाले आहेत. सध्या देशात एकूण चार लाख चार हजार ९५८ सक्रीय रुग्ण आहेत. आतापर्यंत देशात या आजारानं चार लाख २५ हजार १९५ रूग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. दरम्यान, देशात आतापर्यंत ४७ कोटी ८५ लाख ४४ हजार ११४ लसीचे डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.