देशात सोमवारी ३८ हजार ८८७ रुग्ण कोरोनामुक्त

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात गेल्या २४ तासात ३०, हजार ५४९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४२२ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ३८ हजार ८८७ नागरिक बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत तीन कोटी १७ लाख २६ हजार ५०७ रुग्णाना कोरोनाची लागण झाली असून एकूण यापैकी तीन कोटी आठ लाख ९६ हजार ३५४ नागरिक बरे झाले आहेत. सध्या देशात एकूण चार लाख चार हजार ९५८ सक्रीय रुग्ण आहेत. आतापर्यंत देशात या आजारानं चार लाख २५ हजार १९५ रूग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. दरम्यान, देशात आतापर्यंत ४७ कोटी ८५ लाख ४४ हजार ११४ लसीचे डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image