पुण्यातील हॉटेल व्यवसाय सुरु झाल्याने भाजीपाला आणि फळांच्या विक्रीत २० ते २५ टक्के वाढ

 

पुणे (वृत्तसंस्था) : पुण्यातील कोरोनाविषयक निर्बंध शिथिल होऊन हॉटेल व्यवसाय सुरु झाल्यानं घाऊक बाजारातील भाजीपाला आणि फळांच्या विक्रीत २० ते २५ टक्के वाढ झाली आहे. भाजीपाला वाया जाण्याचं प्रमाणदेखील कमी झालं आहे. हॉटेल व्यावसायिकांना रात्री १० वाजेपर्यंत परवानगी मिळाल्यानं ग्राहकांच्या संख्येवरही त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून परतलेले हॉटेल कामगार पुन्हा शहरात येत आहेत.शहरातील तुळशीबाग आणि मंडई परिसर पुन्हा एकदा ग्राहकांनी फुलून गेला असून सणासुदीच्या तोंडावर निर्बंध शिथिल बाजारपेठेत नव चैतन्य दिसून येत आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image