कोविड संकटातून उभारी घेणाऱ्या भारताची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल – प्रधानमंत्री
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड नंतरच्या काळात एका नव्या जागतिक व्यवस्थेचा उदय होत आहे;आणि यात योगदान द्यायचे की नाही हे देशातल्या प्रत्येक नागरिकाने ठरवायचे आहे, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना सांगितले.
भारत कोविड संकटातून उभारी घेत आत्मनिर्भर होण्याकडे वाटचाल करत आहे; भारत आता केवळ मूकपणे बघ्याची भूमिका घेणारा देश राहिलेला नाही; आता जगातला एकासशक्त, बलशाली देश म्हणून आपल्याला पुढे यायचे आहे, आणि त्यासाठी आत्मनिर्भर भारत, व्होकल फॉर लोकल हामूलमंत्र महत्त्वाचा ठरणार असल्याचे प्रधानमंत्री म्हणाले. कोविड काळात आपल्या जीवांची पर्वा न करता झोकून देऊन काम करणाऱ्या डॉक्टर्स, परिचारिका, स्वच्छता कर्मचारी अशा कोविड योद्ध्यांचे त्यांनी आभार मानले.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.