नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेचे अध्यक्ष एम. वेंकय्या नायडू यांनी सर्व पक्षांच्या प्रमुखांची बैठक बोलावली आहे. येत्या ३१ तारखेला ही बैठक होणार असून तत्पूर्वी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनीदेखील २९ तारखेला सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.
लोकसभा आणि राज्यसभेत कामकाज सुरळीत व्हावे यासाठी सरकारनंही ३० तारखेला सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं शुक्रवारी संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाची सुरवात होणार आहे. तर १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.
कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर राज्यसभेचं कामकाज सकाळी ९ ते दुपारी २ आणि लोकसभेचे कामकाज दुपारी ४ ते ९ या वेळेत होणार आहे. पहिले सत्र १५ फेब्रुवारी रोजी संपणार असून दुस-या सत्रातील कामकाज ८ मार्च ते ८ एप्रिल या कालावधीत होणार आहे. दरम्यान येत्या मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.