राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडून आलेल्या उमेदवारांचं एम व्यंकय्या नायडू यांनी स्वागत केलं


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत २० राज्यांमधून निवडून आलेल्या ६१ उमेदवारांचं उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी स्वागत केलं आहे. सुमारे २० राजकीय पक्षांचं प्रतिनिधीत्व करणारे हे ६१ सदस्य आपल्या राजकारणातलं वैविध्य अधोरेखित करतात, असं त्यांनी म्हटलं आहे.

या निवडणुकीनंतर २४५ सदस्यांच्या राज्यसभेत सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं संख्याबळ वाढलं आहे. ६१ पैकी ४३ सदस्य नवे असून, त्यात भाजपाचे ज्योतिरादित्य शिंदे आणि काँग्रेसचे मल्लिकार्जून खर्गे यांचा समावेश आहे.

हे दोघेही याआधी लोकसभेचे सदस्य होते, मात्र २०१९ च्या निवडणुकीत ते पराभूत झाले. माजी प्रधानमंत्री एच.डी.देवेगौडा आणि लोकसभेचे माजी उपसभापती एम तंबीदुराई यांचीही राज्यसभेवर निवड झाली आहे.


Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image