१० वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवाटपाची योजना आयसीएसई बोर्डाने सादर करावी - मुंबई उच्च न्यायालय


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयसीएसई बोर्डाच्या १० वी तसंच १२ वीच्या परिक्षांना प्रत्यक्ष हजर न राहण्याचा पर्याय देणाऱ्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारे गुणवाटप केलं जाईल, याची योजना बोर्डाने २२ जून पर्यंत सादर करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं आज दिले आहेत.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आय सी एस ईच्या १० वीच्या बोर्ड परिक्षा पुढे ढकलल्या होत्या . परंतु या परिक्षांना विद्यार्थी हजर राहिल्यास कोरोनाचं संक्रमण वाढू शकतं, म्हणून विद्यार्थ्यांना परिक्षा न देण्याचा पर्याय उपलब्ध करुन द्यावा यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली, त्यावेळी न्यायालयाने हे निर्देश दिले.

आय सी एस ई बोर्डाने सर्व संलग्न शाळाक़डून १० वी १२ वीच्या विद्यार्थ्यांचे वर्षभराचे गुण मागवून घेतले असून विद्यार्थ्यांना न्याय मिळेल अशा पद्धतीने गुणवाटपाची योजना आखली जाईल.

राज्य सरकारनं परिक्षा घेण्यास मनाई केली तरी आय सी एस ई बोर्ड तो निर्णय स्वीकारेल असं बोर्डाच्या वकीलांनी आज न्यायालयात सांगितलं. 


Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image