केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ परीक्षा घेण्याबाबतचा निर्णय उद्या कळवणार


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊन मुळे पुढे ढकललेल्या आपल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्याबाबत सीबीएसई म्हणजेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ आपला निर्णय, उद्या सर्वोच्च न्यायालयाला कळवणार आहे.

  काही पालकांनी मंडळाकडे, १ ते १५ जुलै दरम्यान होणाऱ्या या परीक्षा रद्द करण्याची आणि विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापन, तसच प्रात्यक्षिक परीक्षांच्या सरासरीच्या आधारावर गुण देण्याची मागणी केली होती. या मागणी संदर्भात विचार करून लवकरच आपण आपला निर्णय कळवू असं मंडळानं सर्वोच्च न्यायालयाला गेल्या आठवड्यात सांगितलं होतं.

  महाराष्ट्र, दिल्ली आणि इतर राज्य सरकारांनी सुद्धा अशीच मागणी, केंद्रीय मनुष्यबळ विकास विभागाकडे केली होती.


Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image