उत्तरेकडच्या राज्यात परतलेल्या नागरिकांसाठी गरीब कल्याण रोजगार अभियान सुरू होणार
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली : आपापल्या राज्यात परतलेल्या स्थलांतरित कामगारांसाठी येत्या शनिवारी, म्हणजे परवा गरीब कल्याण रोजगार अभियान सुरु केलं जाणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरु होणारी ही योजना पुढचे १२५ दिवस मिशन मोडवर चालवली जाणार आहे.
बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड आणि ओडिशा या राज्यांमधल्या ११६ जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली जाईल. याअंतर्गत विविध २५ प्रकारच्या रोजगारातून सुमारे ५० हजार कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांचा विकास होणं अपेक्षित आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.