मेडीगड्डा धरणामुळे राज्यातली जमीन पाण्याखाली गेल्यासंदर्भात सहा सदस्यांची समिती नियुक्त


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तेलंगणा राज्यामधे बांधण्यात आलेल्या मेडीगड्डा धरणामुळे राज्यातली जमीन पाण्याखाली गेल्यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी राज्यशासनानं सहा सदस्यांची एक समिती नियुक्त केली आहे. या धरणाचं बांधकाम राज्यशासनाला कळवल्यानुसार झालेलं नसून, त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातल्या सिरोंचा भागातली बरीचशी जमीन पाण्याखाली गेली आहे, असं राज्यसरकारच्या निवेदनात म्हटलं आहे.


या धरणाच्या बांधकामासाठी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तेलंगणचे तत्कालीन मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी समझोता करार केला होता. संबंधित क्षेत्रातल्या वनाधिका-यांवर दबाव आणून अतिरिक्त जमीन घेतली असल्याचं राज्यशासनाचं म्हणणं आहे. नागपूरच्या विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वाखाली नेमलेल्या या समितीला अहवाल महिनाभरात सादर करायचा आहे.


Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image