वंदे भारत मोहिमेच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यांमधे १०५० विमान उड्डाणं करणार


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोव्हीड काळात परदेशात अडकलेल्या भारतीयांना हवाईमार्गे मायदेशी आणण्यासाठी, वंदे भारत मोहिमेच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यांमधे, एअर इंडिया ३००, तर खाजगी विमान कंपन्या ७५० विमान उड्डाणं करणार आहे. नागरी हवाई उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहरांना ही माहिती दिली.

लॉक डाऊनच्या काळात १८ जून पर्यंत, हवाई आणि जलवाहतुकीद्वारे परदेशातून २ लाख ७५ हजार एवढ्या भारतीयांना मायदेशी आणलं असून उडान सेवेअंतर्गत हवाईमार्गे ९४० टनाची मालवाहतूक केली आहे, अशी माहितीही पुरी यांनी दिली.


Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image